आव्हाटी ता. बागलाण येथिल ग्रामस्थांचा सामाजिक सलोखा कायम!

सटाणा (प्रतिनिधी): आव्हाटी हे एक छोटेसे साधारण दोनहजार वस्तीचे गाव, तसें पाहता शंभर टक्के कृषी प्रधान परंतु सर्व जातीय तेढापासून कायम दूर राहणाऱ्या या टूमदार गावात 100% कुऱ्हाड बंदी करून पर्यावरणाचे संरक्षण होत आहे, येथिल प्रत्येक नागरिक विविध उपक्रमा अंतर्गत विविध सामाजिक, धार्मिक किंवा देश सेवेसाठी आपले योगदान देत आहे, असाच स्तूथ्य उपक्रम गावकर्यांमार्फत घडून आला निमित्त होते गावातील धार्मिक बांधव देविदास मोठाभाऊ भामरे, भाऊसाहेब निंबा भामरे, दीपक कृष्णा भामरे व शंकर जंगलू भामरे हे परिवारा सह एकवीस दिवसाच्या उत्तर भारतात चार धाम यात्रेसाठी गेले होते त्यांचा परतीचा प्रवास दिनांक 7/9/2024 रोजी संपला असता त्याचे औचित्त साधत आव्हाटी ता बागलाण ग्रामस्थ यांनी गाव वेशीवरून टाळ मृदूंगाच्या गजरात विठुरायाचे नाम स्मरण करत भव्य जंगी स्वागत केले, यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच शांताराम नाना भामरे, केदा महाराज, मधुकर बाबाजी भामरे, महादू शंकर सोनवणे, गोकुळ राजाराम भामरे संदीप आनंदा भामरे, नारुआण्णा दादाजी भामरे, भाऊसाहेब वामन भामरे, भाऊराव विठ्ठल भामरे,दौलत दशरथ भामरे, काळू जिभाऊ भामरे, बाळू रामभाऊ भामरे, मधुकर वामन भामरे, किरण शिवाजी भामरे, कैलास जाधव, रवी सोनवणे व आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!