सावतानगरचे नागरिक गेल सात दिवसांपासून करताय गढूळ पाण्याचा सामना

नवीन नाशिक (प्रतिनिधी): परिसरातील सावतानगर येथे गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार तक्रार करून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरात काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच आता सावतानगर भागात सहा ते सात दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या अधिका-यांना कळवूनही दाखल घेतली नसल्याने महिला वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबत मनपाच्या अधिका-यांना सांगितले, तसेच आनलाईन तक्रार देखील केली. मात्र, कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांनी व अ‍ॅड. अतुल सानप यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!