नवीन नाशिक (प्रतिनिधी): परिसरातील सावतानगर येथे गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार तक्रार करून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरात काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच आता सावतानगर भागात सहा ते सात दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या अधिका-यांना कळवूनही दाखल घेतली नसल्याने महिला वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबत मनपाच्या अधिका-यांना सांगितले, तसेच आनलाईन तक्रार देखील केली. मात्र, कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांनी व अॅड. अतुल सानप यांनी सांगितले.
Related Posts
निमाचे कामकाज प्रभावी बनवण्यासाठी विविध समित्यांची स्थापना
आशिष नहार यांनी अध्यक्षपदी न पदभार स्वीकारल्यावर कार्यप्रवृत्तीत नवा उत्साह आणि आणली गती! नाशिक (प्रतिनिधी): नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन…
शिव मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलतर्फे पहिलवान किशोर पवार आणि नाशिकचे पहिलवान निलेश सूर्यवंशी यांचा सन्मान!
नाशिक (प्रतिनीधी) : पंढरपूरचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारे पैलवान किशोर पवार तसेच नाशिकचे नामवंत पैलवान व महाराष्ट्र…
पाडळी देशमुख रेल्वे पुलाखाली पाणी तुंबल्याने पाडळी देशमुखसह १२ वाड्या व शालेय विद्यार्थ्यांना रस्ता बंद
■ पाडळी देशमुख रेल्वे पुलाखाली पाणी तुंबल्याने पाडळी देशमुखसह १२ वाड्या व शालेय विद्यार्थ्यांना रस्ता बंद ■ रेल्वे प्रशासनाने उपाययोजना…
