नवीन नाशिक (प्रतिनिधी): परिसरातील सावतानगर येथे गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधीयुक्त व गढूळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत वारंवार तक्रार करून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. परिसरात काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच आता सावतानगर भागात सहा ते सात दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे. याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या अधिका-यांना कळवूनही दाखल घेतली नसल्याने महिला वर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून परिसरात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. याबाबत मनपाच्या अधिका-यांना सांगितले, तसेच आनलाईन तक्रार देखील केली. मात्र, कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे स्थानिक नागरिकांनी व अॅड. अतुल सानप यांनी सांगितले.
Related Posts
मनपाचे मुख्यालय गाठत नाशिकच्या खड्डेप्रश्नी आक्रमक भूमिका घेत आमदारांनी अधिका-यांना धरले धारेवर!
नाशिक (प्रतिनिधी): नागरिकांचा रस्त्यांवरील खड्डेप्रकरणी रोष असल्याने आधी रस्ते दुरूस्तीची १०० टक्के कामे करा, शासनाकडून निधीची मागणी करा. त्यासाठी आम्हीही…
मराठी वर्षाचा पहिला दिवस; आज नाशिकरांमध्ये गुढी पाडव्याचा उत्साह!
नाशिक (प्रतिनिधी): गुढीपाडवा हा नूतन मराठी वर्षाचा पहिला दिवस… हा दिवस शुभ मानला जात असल्याने गुढीपाडव्याला अनेक प्रकारच्या नवीन कामांना…
कृषी आधारित उद्योगांच्या माध्यमातून नवीन व संघटित बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी कटिबद्ध : कृषिमंत्री ॲड. माणिककराव कोकाटे
नाशिकच्या जागतिक कृषी महोत्सवास उत्स्फूर्त प्रतिसाद! लक्ष्मण सोनवणे, नाशिक/बेलगाव कुऱ्हे (प्रतिनिधी): किरकोळ विक्री साखळ्या आणि कृषी आधारित उद्योगांच्या माध्यमातून नवीन…
