नाशिक (प्रतिनिधी): जुन्या भांडणाची कुरापत काढून धारदार कोयत्याने तरुणाची हत्या करणा-या टोळक्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवार (दि. २७) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पाथर्डी गावात ही घटना घडली होती. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहा संशयितांना हुडकून काढले आहे. दुर्गेश दीपक शार्दुल (वय २३), प्रफुल्ल अमोल दोंदे (वय २०), आयुष ऊर्फ यश विजय दोंदे (वय १९), गौरव रवींद्र दोंदे (वय १९), छोट्या उर्फ करण पंकज भांबळ (वय २०, सर्व रा. पाथर्डी गाव, राजवाडा) व रोहित रामदास वाघ (वय २०, रा. राजीवनगर वसाहत, इंदिरानगर) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. पाथर्डी गावात नटेश विजय साळवे (वय २०, रा. विल्होळी) या तरुणाची रविवारी (दि.२२) रात्री दहाच्या सुमारास हत्या करण्यात आली. पाथर्डी गावातील काझी मंजिल येथे सहा ते सात युवकांनी त्याला गाठून जुन्या वादातून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करीत प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात संशयितांनी नटेश साळवे याच्यावर एकूण २९ वार केल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला होता. जिल्हा रुग्णालयात त्यास मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी शशिकांत गांगुर्डे यांच्या तक्रारीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी रात्रीतून संशयितांना जेरबंद केले आहे.
Related Posts
ओव्हरटेकच्या प्रयत्नात सळईच्या ट्रकला टेम्पोची धडक; पाच ठार, सात जखमी
नाशिक (प्रतिनिधी): निफाड येथून देवदर्शन करून नाशिकला परतणा-या भाविकांच्या वाहनाला शहरातील द्वारका परिसरात उड्डाण पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात…
अल्पवयीन मुलाकडून महिलेचा विनयभंग; मुंबई नाका पोलीस ठाणेबाहेर तीन तास तणाव!
पोलिसांकडून संशयित ताब्यात; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन! नाशिक (प्रतिनिधी):अल्पवयीन मुलाने महिलेची छेड काढल्याची घटना भारतनगर परिसरात घडली. मात्र, या…
अंबड, इंदिरानगरला अडीच लाखांचा दंड वसूल: ५५ तळीरामांवर कारवाई
नाशिक (प्रतिनिधी) : नवीन वर्ष स्वागत जल्लोषात अवघे ५५ तळीराम पोलिसांच्या हाती लागले. तळीरामांचा उपद्रव टाळण्यासाठी व कायदा व्यवस्थेसह अपघात…
