नाशिक (प्रतिनिधी): प्रॉपर्टीच्या वादातून जमावाकडून एका महिलेचा व तिच्या बहिणीचा विनयभंग झाल्याची घटना दि. २८ जून रोजी रात्री साडेअकरा वाजता घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये चौघां संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयित शोएब गुलाम कोकणी, सलीम गुलाम कोकणी, अजगर मैनुद्दिन कोकणी, सायरा हैदरसाहेब कोकणी (रा. उस्मानिया टॉवर, कोकणीपुरा, भद्रकाली) यांच्याशी प्रॉपर्टीच्या वादावरून बाचाबाची झाली. या भांडणाचे पर्यावसान कोकणी कुटुंबातील चौघांनी संबंधित महिलेला शिवीगाळ केली व महिलेचा चुलत भाऊ शोएब कोकणी व सलीम कोकणी या दोघांनी तिला फायटरने मारहाण करीत तिचा विनयभंग केला. पिडीत महिलेला सोडविण्यासाठी गेलेल्या तिच्या बहिणीलाही अजगर व सलीम यांनी मारहाण केली व विनयभंग केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रणदिवे तपास करीत आहेत.
Related Posts
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर स्थानीक विरुद्ध परके सोशल वार
घोटी (प्रतिनिधी): आगामी विधानसभा अगदी काही महिन्यावर होऊ घातली आहे त्या पार्श्वभूमिवर इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात परके विरुद्ध स्थानिक असा…
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर घासलेटची कॅन ओतत आत्मदहनाचा प्रयत्न!
नाशिक (प्रतिनिधी): पोलिसांच्या छळास कंटाळून येथील सुवर्णकार दीपक दुसाने याने केलेल्या आत्महत्येस दोन वर्षे उलटूनही तपास संथगतीने सुरू असल्याची तक्रार…
अपघातात दाेघांचा जिव गेल्यावर अतिक्रमण विभागास आली जाग!
पाथर्डी फाट्यावर १५५ हातगाड्या, टपऱ्या हटवल्या त्रिमूर्ती चाैकातही ३० अतिक्रमणांवर कारवाई संध्या पाटील, नाशिक (प्रतिनिधी): पाथर्डी फाटा येथे रस्त्यालगतअनधिकृत टपरीधारक…
